function downloadVideo() { const videoUrl = document.getElementById('videoUrl').value; // Implement logic to download the video (e.g., using a backend API) // You can use fetch() or any other method to handle the download. // Replace this placeholder with your actual download logic. console.log(`Downloading video from ${videoUrl}`); } Tauktae Cyclone : ...म्हणून मुंबईतल्या नद्या बनल्या कचरावाहिनी

Tauktae Cyclone : ...म्हणून मुंबईतल्या नद्या बनल्या कचरावाहिनी

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईच्या नद्या-नाल्यांमधील गाळ आणि कचरा उचलला न गेल्याने तौक्ते चक्रीवादळामुळे आलेल्या पावसानंतर मुंबईतील नद्या कचरावाहिन्या बनून वाहताना दिसल्या. या नद्यांमधील पाणी काळ्या रंगाचे होते असे निरीक्षण स्थानिकांनी नोंदवले. हा कचरा अर्थातच समुद्रामध्ये जाणार आणि त्यानंतर समुद्र तो किनाऱ्यावर परत फेकणार याची जाणीव स्थानिक प्रशासनाने बाळगणे गरजेचे आहे आणि त्यानुसार काम हाती घेणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मुंबई उपनगरांमध्ये दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्याने नद्यांमधील पाणी कचऱ्यासकट वेगाने वाहायला लागले. या नद्या अक्षरशः काळ्या दिसत असल्याची टीका रिव्हरमार्चर सागर वीरा यांनी केली. नालेसफाई आणि नदीची स्वच्छता न झाल्याने हे अस्वच्छ आणि कचरायुक्त पाणी समुद्रात जाणार आणि त्यामुळे सागरी जीवांना धोका निर्माण होणार याकडे दुर्लक्ष केले जाते, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. नदीस्वच्छतेसाठी कितीही मोहिमा हाती घेतल्या तरी कचरा नदीत येऊ नये म्हणून मूळ स्रोतांवर गांभीर्याने काम केले जात नाही तोवर दर वेळी मोठा पाऊस आला की हा कचरा समुद्रात जाण्याचे प्रमाण कमी होणार नाही, अशी टीका केली जात आहे. पर्यावरणप्रेमी आणि आरे वाचवा चळवळीतील सुशांत बळी यांनी गेल्या आठवड्यात पोयसर नदीकाठावरून काढलेला फोटो सोशल मीडियावर सोमवारी पोस्ट केला. पोयसर आणि दहिसर नदीच्या काठावर असलेल्या घरांमधून हा कचरा वेळेत उचलला जात नसल्याने तो कचरा थेट नाले, उपनद्या यांच्यामध्ये फेकला जातो. अनेकदा नालेसफाई करून गाळही त्याच ठिकाणी ठेवला जातो. पावसाळा सुरू झाला की तो पाण्यासोबत वाहून जातो. या कचऱ्यावर स्रोतापाशीच प्रक्रिया करता आली तर त्यामुळे होणारे पुढील नुकसान आपण टाळू शकतो, असे आवाहन त्यांनी केले. यासाठी केवळ प्रशासन जबाबदार नसून मुंबईकर नागरिकांनीही पुढाकार घेतला पाहिजे, असेही ते म्हणाले. रोगराईची चिंता सोमवारी दुपारी पावसाचा जोर वाढल्यानंतर नदीतील पाणी बाहेर येऊन पूरस्थिती निर्माण होण्याची भीती स्थानिकांना वाटत होती. करोनाकाळात नागरिक आरोग्य आणि वैयक्तिक स्वच्छता याची काळजी घेत असताना नदीतील हा गाळ आणि कचरा आजूबाजूला पसरला असता तर...? दर पावसाळ्यात मोठा पाऊस आला की पूरस्थिती निर्माण होण्याची भीती सातत्याने निर्माण होत असताना हा गाळ आणि कचरा पावसाळ्यापूर्वी वेळेत उचलला जावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. अन्यथा अधिक रोगराईला तोंड द्यावे लागेल अशी चिंता स्थानिकांमध्ये निर्माण झाली आहे.

Post a Comment

0 Comments