function downloadVideo() { const videoUrl = document.getElementById('videoUrl').value; // Implement logic to download the video (e.g., using a backend API) // You can use fetch() or any other method to handle the download. // Replace this placeholder with your actual download logic. console.log(`Downloading video from ${videoUrl}`); } म्युकरमायकोसिसच्या औषधांचा तुटवडा; रुग्णांच्या नातेवाईकांची वाढली धावाधाव

म्युकरमायकोसिसच्या औषधांचा तुटवडा; रुग्णांच्या नातेवाईकांची वाढली धावाधाव

म. टा. विशेष प्रतिनिधी, करोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये या बुरशीजन्य आजाराचे प्रमाण वाढले असून त्यामुळे अनेक रुग्णांचे डोळे काढण्याची ही वेळ आली आहे या आजारावरील बुरशीला प्रतिरोध करणाऱ्या अम्फोटेरिसीन बी या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. काही पालिका रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना हे इंजेक्शन बाहेरून आणायला सांगितले जात आहे. पूर्वी तीन ते साडे तीन हजार रुपयांपर्यंत मिळणाऱ्या या इंजेक्शनची किंमत दहा हजार रुपयांच्या घरात गेली असून, मिळेल त्या किंमतीत हे इंजेक्शन घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. या इंजेक्शनच्या जीएसटीवर वाढ झाल्याने अधिक पैसे मोजावे लागतात, असे सांगण्यात येते. या इंजेक्शनची उपलब्धता येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये होईल, असे पालिका रुग्णालयाचे संचालक डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले. संसर्गाच्या तीव्रतेवर इंजेक्शनची मात्रा ठरते, काही रुग्णांना पाच दिवसांत ५० मिलीग्रॅमची २० इंजेक्शन द्यावी लागतात. त्याचा खर्च गरीब रुग्णांना कसा परवडणार, हा प्रश्न आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून या आजाराचे अनेक रुग्ण उपचारासाठी येत आहे. ग्रामीण भागामध्ये सर्रास दिल्या जाणाऱ्या स्टिरॉइडच्या अतिरिक्त वापरामुळेही हा त्रास होत असेल, अशी शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे. डॉ. आशीष भूमकर यांनी सांगितले की, रक्तवाहिन्यामध्ये निर्माण झालेला संसर्गाचा ब्लॉक काढणे गरजेचे असते, तो काढण्याचे काम सर्जन करतात. तो जोपर्यंत काढला जात नाही, तोपर्यंत इंजेक्शन प्रभावी ठरत नाही. या इंजेक्शनची उपलब्धता योग्यवेळी मिळावी, अशी मागणी त्यांनी रविवारी मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या ऑनलाईन बैठकीत केली. म्युकरमायकोसिस हा आजार मागील अनेक वर्षांपासून आहे आणि त्यावर वैद्यकीय उपचार दिले जात आहेत, मात्र आता तो पोस्ट कोविड अवस्थेमध्ये अवतरल्याने त्यामागील नेमक्या कारणांचा अभ्यास गरजेचा आहे. येत्या दोन महिन्यांत यावर आपण नियंत्रण आणू शकू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments