function downloadVideo() { const videoUrl = document.getElementById('videoUrl').value; // Implement logic to download the video (e.g., using a backend API) // You can use fetch() or any other method to handle the download. // Replace this placeholder with your actual download logic. console.log(`Downloading video from ${videoUrl}`); } मध्य उपनगरांत घरांना मागणी

मध्य उपनगरांत घरांना मागणी

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईत करोनाची दुसरी लाट येण्यापूर्वी गृहनिर्माण क्षेत्रात घरांच्या खरेदीस वेग आला होता. मुंबई महानगर क्षेत्रात गतवर्षीच्या शेवटच्या म्हणजेच ऑक्टोबर ते डिसेंबरच्या तिमाहीत १८ हजार घरांची खरेदी झाली. त्यापैकी विस्तारित मध्य उपनगरातील कल्याण, डोंबिवली आदी भागात खरेदीचा जोर सर्वात जास्त आढळून आला आहे. त्यापाठोपाठ पश्चिम उपनगरांत घरांसाठी मागणी आढळली. विस्तारित मध्य उपनगरात चौथ्या तिमाहीत ५,६७८ घरांची खरेदी झाली आहे. करोना प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून मुंबईसह महानगर क्षेत्रात घरांच्या खरेदीविक्रीवरही दुष्परिणाम झाला होता. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये एकाही नव्या घराची खरेदी झाली नव्हती. हळूहळू परिस्थिती बदलत गेली आणि राज्य सरकारने मुद्रांक शुल्ककपातीचा निर्णय घेतल्याने घरांची मागणी वाढत गेली. त्यातूनच २०२१च्या चौथ्या तिमाहीत मुंबई महानगर क्षेत्रात १८,०१२ घरांची विक्री झाली. गृहनिर्माण क्षेत्रातील ''लिअॅसेस फोरास'' कंपनीने केलेल्या अभ्यासात मुंबई महानगर क्षेत्राचा आठ विभागांमध्ये समावेश केला. त्यात शहर, मध्य उपनगर, पश्चिम उपनगर, ठाणे, नवी मुंबई, विस्तारित मध्य उपनगर, विस्तारित पश्चिम उपनगर, पनवेल समाविष्ट करण्यात आले. त्यापैकी सर्वात जास्त घरांची खरेदी ही विस्तारित मध्य उपनगरांमध्ये झाल्याचे सर्वेक्षणात आढळून आले. विस्तारित पश्चिम उपनगरांमध्ये मिरा रोड, भाईंदर आदी परिसराचा समावेश आहे. २०२०-२१च्या चौथ्या तिमाहीत विस्तारित मध्य उपनगरात ५,६७८ घरांची खरेदी झाली. त्यापाठोपाठ पश्चिम उपनगरांत २,९५१, मध्य उपनगरात २,१९३, विस्तारित पश्चिम उपनगरांत २,००७, नवी मुंबईत १,८८५, पनवेलमध्ये ५३९, शहर भागांत ६३१ घरांची खरेदी झाली. त्यामुळे परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आली की गृहनिर्माण क्षेत्रात पूर्वीप्रमाणेच उलाढाल होणार असल्याचा दावा केला जात आहे. पायाभूत सुविधा निर्णायक विस्तारित मध्य उपनगरांत सर्वाधिक घरांची खरेदी वाढत असताना तेथे निर्माण होणाऱ्या पायाभूत सुविधा हा प्रमुख भाग ठरला आहे. त्यासह मुंबईसह इतर नजीकच्या शहरांशी जोडले जाणेदेखील महत्त्वाचे ठरले आहे. तसेच, सध्या घरातून काम करण्याचे प्रमाण वाढत असल्याने मोठ्या जागांनाही मागणी आल्याचे निरीक्षण रुणवाल समूहाचे व्यवस्थापकीय संचालक सुबोध रुणवाल यांनी नोंदविले.

Post a Comment

0 Comments