function downloadVideo() { const videoUrl = document.getElementById('videoUrl').value; // Implement logic to download the video (e.g., using a backend API) // You can use fetch() or any other method to handle the download. // Replace this placeholder with your actual download logic. console.log(`Downloading video from ${videoUrl}`); } कवी गणेश वसईकर यांचे करोनाने निधन

कवी गणेश वसईकर यांचे करोनाने निधन

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई मराठीतील दीर्घ कवितांमुळे साहित्यविश्वात खास स्थान मिळवलेल्या कवी, समीक्षक (वय ५२) यांचे करोनामुळे शनिवारी रात्री नऊच्या सुमारास अंधेरीच्या रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पत्नीचे अवघ्या काही दिवसांपूर्वी करोनामुळेच निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगी, मुलगा आणि दोन भाऊ आहेत. त्यांच्यावर चकाला येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. वसईकर गेले सात दिवस अंधेरी येथील रुग्णालयात कोव्हिडशी झुंजत होते. त्या आधी २० दिवस वसई येथील रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना अंधेरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. २६ एप्रिलला त्यांच्या पत्नीचे निधन झाले. त्यांना या संदर्भात थेट सांगितले नसले, तरी परिस्थितीचा अंदाज आला असावा, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. पत्नीच्या निधनानंतर त्यांची प्रकृती अधिक खालावल्याची माहिती त्यांचे बंधू सुनील वसईकर यांनी दिली. मराठीमध्ये दीर्घ आणि वेगळ्या जाणिवेची कविता लिहिणारा कवी म्हणून वसईकर यांची ओळख होती. त्यांनी हलाखीच्या परिस्थितीतून पुढे येऊन प्रयत्नपूर्वक लेखनकला जोपासली. ते एलआयसीमध्ये नोकरी करीत होते. महाविद्यालयीन जीवनामध्ये त्यांनी लेखनाला सुरुवात केली. प्रेमकवितांपासून सुरुवात केल्यानंतर कवी, लेखक वर्जेश सोळंकी यांच्याशी संपर्कात आल्यानंतर त्यांच्या कवितेने वेगळे वळण घेतले. मात्र, वसईकर कधीही प्रसिद्धीच्या मागे धावले नाहीत. सोशल मीडियावरही ते फारसे नसायचे. १९९७ मध्ये त्यांचा 'बेधुंद' काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. त्यानंतर 'विलग' आणि 'मधल्या मध्ये' हे त्यांचे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झाले. ''मधल्या मध्ये' या काव्यसंग्रहासाठी त्यांना या वर्षीचा पंडित आवळीकर पुरस्कार जाहीर झाला होता. त्यामुळे त्यांनाही हुरूप आला होता,' असे सोळंकी यांनी सांगितले. मात्र, त्यानंतर नव्या जोमाने लिहिण्याची तयारी आणि मृत्युशी सुरू असलेली झुंज हा वेदनादायक प्रवास असल्याचेही ते म्हणाले. वसईकर यांच्या निधनाची माहिती मराठी साहित्यविश्वामधील अनेकांपर्यंत पोहोचली नसल्याचे समोर आले. काही संवेदनशील लेखक, साहित्यिकांनी त्यांनी सोशल मीडियावरून श्रद्धांजली वाहिली. आपल्यातलाच, आपला आवाज असणारा, कवितेवर 'च' नितांत निष्ठा असलेला आणि प्रसिद्धीसाठी दमछाक होईपर्यंत न पळणारा गणेश वसईकर नावाचा कवी निघून गेल्याची बातमी नुकतीच कळली. सगळेच अनिश्चित आहे. या भयाच्या सावटाखाली आहोत, आपण सगळेच. पुढचा नंबर कुणाचा आहे ? इतकेच... त्यांची पत्नीही निघून गेली काही दिवसांपूर्वी. त्यांच्या लहानग्या जीवांना काय सांगणार आहोत आपण? - डॉ. प्रज्ञा दया पवार, कवयित्री नेमाडे सर म्हणाले, हा तुझा भाऊ आहे का? मी म्हटले, असावा! आंगणेवाडीच्या जत्रेत हरवला असेल लहानपणी... गणेश, आता तर कायमचाच हरवून गेलास त्याचे काय रे? - प्रवीण बांदेकर, लेखक आमच्या कवितेचा प्रवास एकाच रेषेत झाला. आमची जोडी वर्जेश सोळंकी आणि गणेश वसईकर ही छापा-काट्यासारखी प्रसिद्ध होती. माणसाला मृत्यू येणारच आहे. पण असा येऊ नये. माझ्यासाठी तो जिवंत आहेच. त्याच्याशिवाय आमचे पान हलायचे नाही. मित्र आपले नातेवाईक असतात. माझ्यासाठी तो तसाच होता. - वर्जेश सोळंकी, कवी, लेखक

Post a Comment

0 Comments