function downloadVideo() { const videoUrl = document.getElementById('videoUrl').value; // Implement logic to download the video (e.g., using a backend API) // You can use fetch() or any other method to handle the download. // Replace this placeholder with your actual download logic. console.log(`Downloading video from ${videoUrl}`); } फडणवीसांनी भ्रष्टाचारी कंपनीची नियुक्ती केली का? काँग्रेसचा बोचरा सवाल

फडणवीसांनी भ्रष्टाचारी कंपनीची नियुक्ती केली का? काँग्रेसचा बोचरा सवाल

मुंबई : मनोरा आमदार निवासातील कथित भ्रष्टाचारावरून भाजपने गंभीर आरोप केल्यानंतर काँग्रेसनेही पलटवार केला आहे. या प्रकरणावरून भाजपवरच प्रश्नांची सरबत्ती करत काँग्रेस प्रवक्ते यांनी टीका केली आहे. तसंच भाजपने या प्रकरणात माफी मागावी, अशी मागणीही सावंत यांनी केली आहे. 'सत्ता हव्यासापोटी मविआ सरकारला बेफाम आरोपांनी बदनाम करणारा भाजप पुन्हा उघडा पडला आहे. मनोरा पुनर्बांधणीचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला व मोदी सरकारच्या NBCC ला काम दिले. अतुल भातखळकर यांनी प्रकल्प किंमत ९०० कोटी रुपये कशी आली ही माहिती न घेता भ्रष्टाचार झाला ही बोंब ठोकली आहे,' असा घणाघात करत सचिन सावंत यांनी भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. 'फडणवीसांनी भ्रष्टाचारी कंपनीची नियुक्ती केली का?' 'मोदी सरकारच्या एनबीसीसी कंपनीने अकार्यक्षमतेकरिता काढले जाण्यापूर्वी २८ फेब्रु २०२० ला विधिमंडळाला दिलेल्या ई टेंडर नोटीस मसुद्यामध्ये प्रकल्प किंमत ८१० कोटी रुपये सांगितली. नंतर ८ डिसेंबर २०२० रोजी याच कंपनीने प्रकल्पाची किंमत अंदाजपत्रकात ८७५.६२ कोटी रुपये इतकी वाढवली,' असा दावा सावंत यांनी केला आहे. यावेळी मोदी सरकार आणि यांचा उल्लेख करत भाजपने माफी मागावी, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे. 'आता ठेकेदारांची तांत्रिक पूर्व अर्हता निविदा सुरू आहे. ठेकेदारांची पात्रता प्रकल्प किंमतीपेक्षा अधिकची असते. मोदी सरकारच्या एनबीसीसीने भ्रष्टाचार केला का? फडणवीसांनी भ्रष्टाचारी कंपनीची नियुक्ती केली का? भाजपाने उत्तर द्यावे व निर्लज्जपणे खोटे आरोप केल्याबद्दल तात्काळ माफी मागावी,' असं सचिन सावंत यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.

Post a Comment

0 Comments