function downloadVideo() { const videoUrl = document.getElementById('videoUrl').value; // Implement logic to download the video (e.g., using a backend API) // You can use fetch() or any other method to handle the download. // Replace this placeholder with your actual download logic. console.log(`Downloading video from ${videoUrl}`); } मान्सूनपूर्व सज्जता

मान्सूनपूर्व सज्जता

वसाळा तोंडावर आहे. एकीकडे करोना तर दुसरीकडे पावसाळ्याचे नियोजन करण्यासाठी महापालिकेची जोरदार लगबग सुरू आहे. नालेसफाई, पाणी तुंबण्याची संभाव्य ठिकाणे, रस्त्यांची कामे आणि कोस्टल रोडच्या कामाची गती कायम ठेवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. ३१ मेपर्यंत ही कामे पूर्ण करण्याची मुदत प्रशासनाने सर्व विभागांना दिली आहे. गाळ किती निघाला? पावसाळापूर्व नालेसफाई व गाळ काढण्याच्या कामांची सुरुवात ऑक्टोबर २०२० मध्ये करण्यात आली. यंदा नालेसफाईसाठी ७० कोटीची तरतूद आहे. मागील वर्षी मुंबईत मिठी नदी व लहानमोठ्या नाल्यांमधून पाच लाख चार हजार १२५ मेट्रिक टन गाळ निघाला. यंदा त्यामध्ये ३५ टक्के वाढ गृहित धरून सहा लाख ८५ हजार ३५८ टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट आहे. यापैकी एप्रिल अखेर नाल्यांतील २.२५ लाख टनांहून अधिक म्हणजे ६० टक्क्यांहून अधिक गाळ काढण्यात आला आहे. तसेच, मिठी नदीतील दीड लाख टनांहून अधिक म्हणजे ४० टक्के गाळ काढण्यात आला आहे. पाणी तुंबण्याची ठिकाणे मुंबईत पावसाचे पाणी साठण्याची संभाव्य ४०६ ठिकाणे आढळली आहेत. ती शोधून तेथील आवश्यक कामे सुरू झाली आहेत. यापैकी ३७० ठिकाणी कामे पूर्ण झाली आहेत. पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी यंदा ४७० पंप भाड्याने घेतले जातील. शहर आणि उपनगरात मेट्रो रेल्वेची कामे सुरू आहेत. या कामातून निघणारा राडारोडा वेळीच हलवावा तसेच या कामांमुळे पावसाळ्यात पाणी साचणार नाही, याची काटेकोर काळजी मुंबई मेट्रो प्रशासनाने घ्यावी, असे आदेश देण्यात आले आहेत. सर्व विद्युत वितरण कंपन्यांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सर्व उपाययोजना करावी तसेच विद्युत वितरण व्यवस्थेचे ऑडिट करावे, असेही सांगण्यात आले आहे. हिंदमाता, गांधी मार्केटचा प्रश्न दरवर्षी परळ येथील हिंदमाता आणि शीव येथील गांधी मार्केट या भागांमध्ये हमखास पाणी साचते. नियोजनबद्ध कामामुळे तेथील पाण्याचा निचरा आता पूर्वीपेक्षा वेगाने होतो, असा पालिकेचा दावा आहे. या दोन्ही ठिकाणी पाणी साठवणाऱ्या भूमिगत टाक्या बांधण्यात येत आहेत. सखल भागात पावसाचे पाणी भरू लागले तर ते या टाक्यांमध्ये सोडण्यात येईल. भरती ओसरल्यानंतर हे पाणी समुद्रात सोडण्यात येईल. यामुळे पाणी साचणार नाही, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी नमूद केले. गांधी मार्केट भागात १६ हजार घनमीटर प्रति तास क्षमतेने पाणी उपसा करू शकणारे दोन पंप बसत आहेत. १२०० मिमी व्यासाच्या वाहिनीतून हे पाणी भारतनगर रेल्वे नाल्याजवळ सोडण्यात येईल. त्याचे तीस टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल. १४ कोटींचे हे काम असून त्यात चार वर्षे देखभालीचाही समावेश आहे. पहिल्या टप्प्यातील कामे हिंदमाता हा बशीसारखा खोल परिसर असून त्यामुळे पाणी साचते. यावर उपाय म्हणून ६० हजार घनमीटर पाणी साठवण क्षमता असलेली भूमिगत टाकी दादर पश्चिम येथील प्रमोद महाजन उद्यानात तर ४० हजार घनमीटर क्षमतेची भूमिगत टाकी परळच्या सेंट झेवियर मैदानात बांधण्यात येते आहे. हिंदमाता पुलाखाली व मडकेबुवा चौकातही भूमिगत टाकी बांधली जात आहे. ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे प्रयत्न आहेत. पहिल्या टप्प्यात प्रमोद महाजन उद्यानातील टाकीत १५ हजार घनमीटर तर सेंट झेवियर मैदान टाकीत १४ हजार घनमीटर पाणी साठेल. ही कामे पूर्ण झाल्यानंतर दोन्ही परिसरांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे. समन्वयाचे प्रयत्न पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील विविध सरकारी यंत्रणांमध्ये योग्य समन्वयासाठी पालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक झाली. या बैठकीला मध्य व पश्चिम रेल्वे, पोलिस, नौदल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद प्राधिकरण, हवामान खाते, एमएमआरडीए, म्हाडा, मुंबई मेट्रो, राज्य सरकारचे सार्वजनिक बांधकाम खाते, बेस्ट, विविध विद्युत वितरण कंपन्यांच्या प्रतिनिधींसह विविध संस्थांचे प्रतिनिधी हजर होते. या यंत्रणांना आपल्या हद्दीतील कामाचे नियोजन करून त्याची माहिती पालिकेला देण्यास सांगण्यात आले आहे. मुंबई पोर्ट ट्रस्ट, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर जिल्हा, हॅम रेडिओ यांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या स्तरावर केलेल्या तयारीची माहिती यावेळी दिली.

Post a Comment

0 Comments