function downloadVideo() { const videoUrl = document.getElementById('videoUrl').value; // Implement logic to download the video (e.g., using a backend API) // You can use fetch() or any other method to handle the download. // Replace this placeholder with your actual download logic. console.log(`Downloading video from ${videoUrl}`); } ...म्हणून चित्रीकरणाचा मोर्चा गोव्याकडून गुजरातकडे?

...म्हणून चित्रीकरणाचा मोर्चा गोव्याकडून गुजरातकडे?

म. टा. प्रतिनिधी, मुंबई राज्यातील वाढता करोना प्रादुर्भाव लक्षात घेत राज्य सरकारने सर्व चित्रीकरणांवर बंदी आणली होती. त्यांनतर अनेक हिंदी-मराठी मालिकांचे चित्रीकरण राज्याबाहेर गोवा, दमण, सिल्वासा, हैदराबाद, या ठिकाणी हलवण्यात आले. पण, आता गोव्यामध्ये 'द एंटरटेन्मेंट सोसायटी ऑफ ' (ईएसजी) या सरकारी संस्थेने मालिकांना चित्रीकरणासाठी दिलेली परवानगी रद्द केल्याने निर्मात्यांनी आपला मोर्चा गुजरातकडे वळवल्याचे समजते. 'इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्युसर्स कौन्सिल' व दूरचित्रवाहिन्यांची बैठक नुकतीच पार पडली. यात सद्यस्थितीवर चर्चा करण्यात आली. १२हून अधिक मराठी-हिंदी मालिकांचे चित्रीकरण गेले काही आठवडे गोव्यातील विविध ठिकाणी सुरू होते. पण, आता गोव्यातील चित्रीकरणाचे 'पॅकअप' झाल्याने कुठे जायचे, असा प्रश्न मालिकानिर्मात्यांना पडला असून, इतर कोणत्या राज्यात चित्रीकरण करता येऊ शकते, या पर्यायांचा शोध मालिकांचा चमू सध्या घेत आहे. गोव्यातील काही मालिकांचे सेट सिल्वासा, दमणकडे हलवण्याचा पर्याय सध्या विचाराधीन असल्याचे समजते. या मालिकांतील काही कलाकार आणि तंत्रज्ञ आता मुंबईच्या दिशेने यायला निघाले आहेत. मुंबईत आल्यानंतर ते पुढे सिल्वासा, दमण, गुजरातच्या दिशेने प्रवास करतील, असे सांगण्यात आले. देशभरातील बहुतांश राज्यांमध्ये पूर्ण लॉकडाउन, तर काही ठिकाणी मिनी लॉकडाउनची परिस्थिती आहे. परिणामी सध्या ज्या ठिकाणी चित्रीकरण सुरू आहे, तेथील निर्बंध कडक केले गेल्यास चित्रीकरण बंद होण्याची भीती वर्तवली जात आहे. याशिवाय करोनाचा वाढत कहर पाहता देशव्यापी लॉकडाउनची चर्चासुद्धा जोर धरत आहे. त्यामुळे दूरचित्रवाहिन्या आणि मालिकानिर्मात्यांची चिंता वाढली आहे.

Post a Comment

0 Comments