function downloadVideo() { const videoUrl = document.getElementById('videoUrl').value; // Implement logic to download the video (e.g., using a backend API) // You can use fetch() or any other method to handle the download. // Replace this placeholder with your actual download logic. console.log(`Downloading video from ${videoUrl}`); } bhima koregaon case: 'रुग्णालयात जाण्याऐवजी ......'स्टॅन स्वामींनी न्यायालयात मांडले म्हणणे

bhima koregaon case: 'रुग्णालयात जाण्याऐवजी ......'स्टॅन स्वामींनी न्यायालयात मांडले म्हणणे

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई 'तळोजा तुरुंगात आठ महिन्यांपूर्वी आल्यापासून माझी प्रकृती ढासळत आहे. मी या तुरुंगात आलो, तेव्हा माझ्या शरीराचे अवयव नीट काम करत होते. मात्र, आता एकामागोमाग अवयव निकामी होऊ लागले आहेत', अशी माहिती मुंबई उच्च न्यायालयाला व्हिडीओ कॉलवर देतानाच उपचारांसाठी जे. जे. रुग्णालयात दाखल होण्याऐवजी मरणे पसंत करेन, असे म्हणणेही कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणातील सर्वाधिक वयाचे आरोपी (८४) यांनी शुक्रवारी मांडले. तुरुंगात माझी प्रकृती खालावली असून पार्किन्सन्स व अन्य आजारही आहेत. करोनासंकटामुळे आरोग्याला आणखी धोका निर्माण झाला आहे, असे म्हणत स्वामी यांनी ज्येष्ठ वकील मिहिर देसाई यांच्यामार्फत याचिका केली आहे. विशेष एनआयए न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याने त्यालाही त्यांनी याचिकेत आव्हान दिले आहे. न्या. शाहरुख काथावाला व न्या. सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठाने स्वामींच्या प्रकृतीची दखल घेऊन त्यांना गुरुवारी, २० मे रोजी जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेऊन त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश तुरुंग प्रशासनाला दिले होते. त्यानुसार तुरुंग प्रशासनाने अहवाल दिला. त्यात स्वामींना दोन्ही कानांनी नीट ऐकून येत नसून कंपवाताचाही त्रास आहे, मात्र त्यांचे हृदयाचे ठोके व्यवस्थित असल्याचे नमूद करण्यात आले. न्यायालयाच्या निर्देशांप्रमाणे तुरुंग प्रशासनाने स्वामींना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजरही केले. त्यानंतर खंडपीठाने स्वामी यांच्याशी थेट संवाद साधला. त्यावेळी 'मी तळोजा तुरुंगात आठ महिन्यांपूर्वी आलो तेव्हा माझे पूर्ण शरीर व्यवस्थित काम करत होते. मात्र, मागील आठ महिन्यांत माझी प्रकृती ढासळत गेली आणि शरीराचा एकेक अवयव निकामी होऊ लागला आहे. मी पूर्वी स्वत: अंघोळ करू शकत होतो, चालू शकत होतो आणि काही तरी लिखाणही करू शकत होतो. आता मात्र मला दुसऱ्यांवर अवलंबून रहावे लागत आहे. इतरांची मदत घेऊन मला चमच्याने जेवण खावे लागते. तळोजा तुरुंगात राहिल्यानेच माझी ही अवस्था झाली आहे', असे म्हणणे स्वामींनी मांडले. त्यानंतर 'उपचारांसाठी जे. जे. रुग्णालयात दाखल व्हायचे आहे का?', अशी विचारणा खंडपीठाने केली. तेव्हा 'जेजेमध्ये माझ्यावर काय उपचार होणार? मला यापूर्वी दोनदा तिथे दाखल करण्यात आले होते. मला तेथील व्यवस्था माहीत आहे. जेजेमध्ये दाखल होऊन काही उपयोग होईल, असे मला वाटत नाही. त्यामुळे मला तिथे दाखल व्हायचे नाही. त्याऐवजी त्रास असाच सुरूच राहून मरणे मी पसंत करेन. मला रांचीमध्ये माझ्या मित्रांसोबत राहू द्यावे', असे म्हणणेही स्वामींनी मांडले. तेव्हा 'आम्ही सध्या अंतरिम जामिनाविषयी विचार करत नसून केवळ तुमच्या वैद्यकीय उपचारांचा विचार करत आहोत', असे खंडपीठाने स्पष्ट केले. 'याचिकादाराला कदाचित कोणी तरी पढवले आहे किंवा ते स्वत: खूप हुशार आहेत. म्हणून ते जामिनासाठी आग्रह धरत आहेत', असे निरीक्षणही खंडपीठाने नोंदवले. अखेरीस अॅड. देसाई यांनी हस्तक्षेप करत स्वामी यांच्याशी बोलू देण्याची आणि रुग्णालयात उपचार घेण्याविषयी त्यांची समजूत घालण्याची संधी द्यावी, अशी विनंती न्यायालयाला केली. 'स्वामी हे ख्रिस्ती धर्मगुरू असल्याने लोक काय करत आहेत, हे त्यांना कळत नाही, असे म्हणत क्षमाशील राहतात आणि तशी भूमिका घेतात', असेही देसाई यांनी न्यायालयाला सांगितले. त्यामुळे खंडपीठाने देसाई यांना स्वामींशी संवाद साधून भूमिका मांडण्याची संधी देऊन पुढील सुनावणी ७ जून रोजी ठेवली.

Post a Comment

0 Comments