
मुंबई: सरकारच्या काळात २०१६-१७ मध्ये करण्यात आले होते त्यात माझाही फोन टॅप करण्यात आला होता, अशी माहिती मला मिळाली असल्याचे सांगत प्रदेशाध्यक्ष यांनी गंभीर आरोप केले आहेत. विशेष म्हणजे हे फोन टॅपिंग झाले तेव्हा नाना पटोले भाजपचे खासदार होते.
वाचा: अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्याच्या नावाखाली राजकीय नेत्यांचे फोन टॅपिंग करण्यात आले होते. यात माझा फोन टॅप करण्यासाठी अमजद खान असे खोटे नाव वापरण्यात आले होते, असे नमूद करताना या फोन टॅपिंगशी संबंधित सर्वांची महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.
वाचा: फडणवीस सरकारच्या काळात माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, तसेच शिवसेनेतील काही महत्त्वाचे नेते आणि काही आयएएस, आयपीएस अधिकारी यांचेही फोन टॅप केले जात होते. माझा संबंध अंमली पदार्थांच्या तस्करीशी जोडण्याचा प्रयत्न करून हा निंदनीय व अश्लाष्य प्रकार करण्यात आला आहे. फोन टॅपिंग करताना नावे व पत्ते खोटे तसेच बनावट दाखवून फोन टॅप करण्यात आले.
हे फोन टॅपिंग कोणी केले आणि त्यांना परवानगी कोणी दिली? फोन टॅपिंग करण्याचा उद्देश काय होता ? फोन टॅप करून एखाद्या व्यक्तीवर पाळत ठेवणे हा गुन्हा आहे तसेच हा प्रकार व्यक्तीस्वातंत्र्याचा भंग करणारा असून राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे खपवून घेणार नाही, असेही पटोले म्हणाले.
नेमकं केव्हा झालं होतं फोन टॅपिंग? अमजद खान या नावाने १३ नोव्हेंबर २०१७ आणि १८ सप्टेंबर २०१७ या दिवशी नाना पटोले यांचा फोन टॅप करण्यात आला होता. त्यासाठी गोंदियातील पत्ता वापरण्यात आला होता. पटोले यांचे निकटचे सहकारी उमेश डांगे यांचा फोन इम्तियाज रफिक शेख या नावाने १८ सप्टेंबर रोजी टॅप करण्यात आला. तर पटोले यांचे निकटवर्तीय वास्तुविशारद अभिषेक देशपांडे यांचा फोन सरफराज खान या नावाने २ नोव्हेंबर २०१७ रोजी टॅप करण्यात आला. या तिघांनीही वेगवगेळे पत्ते वापरले होते, असा आरोप करण्यात आला आहे.
0 Comments