function downloadVideo() { const videoUrl = document.getElementById('videoUrl').value; // Implement logic to download the video (e.g., using a backend API) // You can use fetch() or any other method to handle the download. // Replace this placeholder with your actual download logic. console.log(`Downloading video from ${videoUrl}`); } Cyclone Tauktae Update: तौत्के चक्रीवादळाचा मुंबईला धोका नाही; सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस बरसणार

Cyclone Tauktae Update: तौत्के चक्रीवादळाचा मुंबईला धोका नाही; सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस बरसणार

मुंबई: चक्रीवादळाचा शहराला धोका नाही. हे चक्रीवादळ मुंबईनजीकच्या समुद्रातून जाणार असल्याने त्याच्या प्रभावाने मुंबईत पाऊस होण्यासह वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामान खात्याने आज मुंबई महापालिकेत झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. ( ) आज मुंबईतील वाऱ्याचा वेग हा ताशी चाळीस ते पन्नास किमीपर्यंत जाऊ शकतो तर उद्या ( रविवारी) १६ मे रोजी सायंकाळपासून वाऱ्याचा वेग वाढून तो ताशी ६० किमीपर्यंत जाऊ शकतो. काही ठिकाणी हा वेग ताशी ८० किमीपर्यंतही जाऊ शकेल, अशी माहिती या बैठकीदरम्यान भारतीय हवामान खात्याद्वारे देण्यात आली आहे. त्याचवेळी पावसाचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईत त्याबाबत खबरदारी घ्यावी लागणार असून त्यासाठी महापालिका यंत्रणा सज्ज झाली आहे. मुंबईला वादळाचा धोका नसला तरी वादळी वारे वाहणार असल्याने व पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. नागरिकांनी आज व उद्या घरातच राहावे. अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. समुद्र किनारी जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईत रस्त्याच्या कडेला वा वस्तीत धोकादायक स्थितीत होर्डिंग असल्यास ते हटवण्याची सूचनाही संबंधितांना देण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी दोन दिवस धोक्याचे सिंधुदुर्ग: जिल्ह्यात ठिकठिकाणी कमी जास्त प्रमाणात आज पाऊस झाला. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी किनारपट्टी भागाची पाहणी केली. मालवण किनारा, वेंगुर्ले किनारा येथे त्यांनी भेटी देऊन यंत्रणेला आवश्यक त्या सूचना दिल्या. पुढील दोन दिवस नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. तौत्के चक्रीवादळ सिंधुदुर्गजवळच्या समुद्रातून उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत पुढे जाईल. त्यामुळे आज आणि उद्या असे दोन दिवसात अधिक सतर्क रहाणे गरजेचे आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. ताशी ७० ते ८० किलोमीटर वेगाने वारे वाहतील असा अंदाजही वर्तवण्यात आला असून मच्छिमार आणि किनारपट्टीवरील नागरिकांनी सतर्क रहावे असेही आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांना किंवा जनावरे स्थलांतरित करण्याची वेळ आली तर पोलिसांनी सिद्धता केली आहे, असे जिल्हा पोलीस प्रमुख राजेंद्र दाभाडे यांनी सांगितले. दरम्यान, जिल्ह्यात काही भागात आज पाऊस झाला. दोन्ही जिल्ह्यांत समुद्र खवळलेला असून किनाऱ्यावर लाटांच्या जोरदार धडका बसत आहेत. वाचा:

Post a Comment

0 Comments