function downloadVideo() { const videoUrl = document.getElementById('videoUrl').value; // Implement logic to download the video (e.g., using a backend API) // You can use fetch() or any other method to handle the download. // Replace this placeholder with your actual download logic. console.log(`Downloading video from ${videoUrl}`); } मुंबईच्या 'या' भागात नियमांचे पालन न केल्याच्या सर्वाधिक तक्रारी

मुंबईच्या 'या' भागात नियमांचे पालन न केल्याच्या सर्वाधिक तक्रारी

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान सुरू असतानाही लोकांचा हलगर्जीपणा कायम आहे. मास्क वापरा, सुरक्षित वावर पाळा, गर्दी करू नका, या निर्बंधाबाबत वारंवार सांगूनही लोकांकडून हे नियम सर्रास पायदळी तुडविले जात आहेत. दुसऱ्या लाटेमध्ये गेल्या दीड महिन्यात उत्तर मुंबईत सर्वाधिक साडेतीन हजार गुन्हे दाखल केले आहेत. मुंबईमध्ये ५ एप्रिलपासून आतापर्यंत १५ हजार ३२२ गुन्हे दाखल झाले आहेत. पहिल्या लाटेदरम्यान मुंबई पोलिसांनी २७ हजारांपेक्षा अधिक गुन्हे दाखल केले होते. करोनाची दुसरी लाट येताच राज्य सरकारच्या वतीने मुंबईसह राज्यभरात कडक निर्बंध लावण्यात आले. मुंबई पोलिसांनीही या निर्बंधाची कडक अंमलबजावणी करीत नियम मोडणाऱ्यांवर पुन्हा गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली. ५ एप्रिलपासून पुन्हा सुरू करण्यात आलेल्या धडक कारवाईमध्ये १५ हजार ३२२ गुन्हे दाखल करण्यात आले असून यामध्ये सर्वाधिक नियमभंगाचे गुन्हे हे उत्तर मुंबईत आहेत. उत्तर मुंबईत ३५०८ गुन्हे दाखल करण्यात आले असून दुसऱ्या क्रमांकावर ३,४७८ गुन्ह्यांसह मध्य मुंबई आहे. उत्तर मुंबईत विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर १२३४, दुकानांवर ११४१, मास्क न घालणाऱ्यांवर ६३१, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणाऱ्यांवर २८६, अवैध वाहतूक करणाऱ्यांवर ९७ आणि फेरीवाल्यांवर ४७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावरून उत्तर मुंबईत नियमांचे गांभीर्याने पालन केले जात नसते हे दिसून येते. प्रकार दक्षिण मध्य पूर्व पश्चिम उत्तर हॉटेल २० ८४ ११७ १०५ ४६ सार्वजनिक ठिकाणी गर्दी १८६ ३०१ २०८ २२४ २८६ मास्क न वापरणे ६५५ ६५१ ९९७ ६७८ ६३१ विनाकारण फिरणे १४९१ १२६६ ६८५ ५३८ १२३४ इतर दुकाने २१६ १०३६ ७२१ ८९० ११४१ पान टपरी ०३ ४३ २३ १६ २५ अवैध वाहतूक २२ ०८ ७१ ०३ ९७ करोना संदर्भात ३४ ११ १८ २३४ ०१ इतर ४५ ११८ १०५ ३१ ४७ दक्षिण मुंबईत विनाकारण फिरणारे अधिक मुंबई पोलिसांनी दीड महिन्यात दाखल केलेल्या एकूण गुन्ह्यांची संख्या पाहता दक्षिण मुंबईत सर्वात कमी म्हणजेच २६७२ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. ही संख्या एकूण संख्येची कमी असली तरी यामध्ये विनाकारण फिरणाऱ्यांवर १,४९१ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. विनाकारण फिरणाऱ्यांवर मध्य मुंबईत १२६६, १२३४, पूर्व उपनगरात ६८५ तर पश्चिम उपनगरांमध्ये ५३८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Post a Comment

0 Comments