function downloadVideo() { const videoUrl = document.getElementById('videoUrl').value; // Implement logic to download the video (e.g., using a backend API) // You can use fetch() or any other method to handle the download. // Replace this placeholder with your actual download logic. console.log(`Downloading video from ${videoUrl}`); } मालवाहतुकीचा खोळंबा टळला

मालवाहतुकीचा खोळंबा टळला

म. टा. प्रतिनिधी, मुंबई ट्रकचालकाला अनिवार्य असल्याचा निर्णय मागे घेण्यात आल्याने होणारा मालवाहतुकीचा खोळंबा टळला आहे. अखिल भारतीय व्यापारी महासंघ अर्थात 'कॅट'च्या मुंबई महानगरने या निर्णयाला विरोध केला होता. करोनानिर्बंधांना ३१ मेपर्यंत मुदतवाढ देताना सर्व ट्रकचालकांना दर ४८ तासांनी आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य केली होती. पण त्याचा मालवाहतुकीवर भीषण परिणाम होण्याची भीती होती. त्याचा भाडेदरावरही परिणाम होण्याची भीती होती. याविषयी 'कॅट' तसेच अखिल भारतीय खाद्यतेल व्यापारी महासंघाने राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. याबाबत 'कॅट' महानगरचे अध्यक्ष शंकर ठक्कर यांनी सांगितले की, 'अनेक मालवाहतुकीला तीन ते चार दिवसांचा कालावधी लागतो. अशावेळी चाचणी केल्यानंतर त्याचा निकाल येण्यासह चार दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे यादरम्यान सामान पोहोचण्यास विलंब होण्याची शक्यता होती. सध्या खाद्यतेलाची तूट असल्याने बहुतांश तेल परराज्यातून बोलवावे लागत आहेत. त्याय खोळंबा होण्याची शक्यता होती. त्यामुळेच आता हा निर्णय मागे घेण्यात आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.'

Post a Comment

0 Comments