function downloadVideo() { const videoUrl = document.getElementById('videoUrl').value; // Implement logic to download the video (e.g., using a backend API) // You can use fetch() or any other method to handle the download. // Replace this placeholder with your actual download logic. console.log(`Downloading video from ${videoUrl}`); } लशीने वाचवले ज्येष्ठांना?

लशीने वाचवले ज्येष्ठांना?

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोना संसर्गाची सुरूवात झाली त्या पहिल्या लाटेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना संसर्गाची लागण होण्याचे व करोनामुळे गुंतागुंत निर्माण होऊन मृत्यू होण्याचे प्रमाण मोठे होते. मात्र करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमध्ये हे प्रमाण कमी झाल्याचे दिसते. वैद्यकीय तज्ज्ञांनी या विषयावर केलेल्या विश्लेषणामध्ये करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत वयोवृद्धामध्ये झालेल्या लसीकरणामुळे हे प्रमाण कमी झाल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. संसर्गजन्य आजाराचे तज्ज्ञ डॉ. एम. व्ही. नायर यांनी करोना संसर्गापासून लसीकरण शंभर टक्के संरक्षण देत नाही. मात्र ज्यांना लसीकरणानंतरही करोना संसर्गाची लागण झाली आहे त्यांना संसर्गाची लक्षणे तीव्र नव्हती. या संसर्गामुळे त्यांचा मृत्यू ओढावला नसल्याची दिलासादायक बाब पुढे आली आहे. वैद्यकीय विश्लेषणामध्ये राज्यात ३१ ते ४० वयोगटातील ११ लाख ६८ हजार ५१५ तरुणांना करोना संसर्गाची लागण झाल्याचे दिसून येते. हे प्रमाण २२.३२ टक्के इतके आहे २१ ते ३० या वयोगटामध्ये ९ लाख ३४ हजार ७७१ म्हणजे १७.८५ टक्के व्यक्तींना संसर्ग झाला आहे. तर ४१ ते ५० या वयोगटामध्ये १८.०९ टक्के जणांना करोना संसर्गाची लागण झाल्याचे दिसून येते. या तुलनेमध्ये ५१ ते ६० व ६१ ते ७० व ७१ ते ८० या वयोगटामध्ये झालेल्या संसर्गाचे प्रमाण हे १४ ते ४ टक्के इतके नोंदवण्यात आले आहे. पहिल्या लाटेच्या वेळी ५१ ते ८० या वयोगटामध्ये टक्केवारीमध्ये हे प्रमाण १६ ते २० टक्के इतके होते. राज्याच्या मृत्युदर समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी, लसीकरणामुळे निश्चितच मदत झाल्याचे मत व्यक्त केले. जे रुग्ण पूर्वी संसर्गानंतर लगेच आयसीयूमध्ये जात होते त्यांच्या प्रकृतीमध्ये होत असलेली गुंतागुंत व लक्षणांची तीव्रता कमी झाली आहे. अतीदक्षता विभागात दाखल होण्याचे या वयोगटातील रुग्णांचे प्रमाण कमी झाले, असे सांगितले. पहिल्या लाटेमध्ये मार्च ते डिसेंबर या कालावधीमध्ये ६१ ते ७० या वयोगटातील ६.७८ टक्के मृत्यू नोंदवण्यात आले. तर ७१ ते ८० या वयोगटामध्ये हे प्रमाण ९.३८ टक्के होते, ८१ ते ९० या वयोगटात मृत्यूचे प्रमण ११.२७ इतके होते. १ जानेवारी ते ९ मे २०२१ या कालावधीमध्ये ज्येष्ठ नागरिकांमध्ये रुग्णसंख्या अधिक असली तरीही मृत्यूदराची टक्केवारी निश्चितपणे कमी होती. ६१ ते ७० या वयोगटामध्ये २.२८, ७१ ते ८० या वयोगटात ३.०६ तर ८१ ते ९० या वयोगटामध्ये ३.८० टक्के मृत्यूदराची नोंद करण्यात आली आहे. लसीकरणावर भर देण्याची गरज जुलैमध्ये करोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता वैद्यकीय अभ्यासकांनी नोंदवली आहे. या संसर्गलाटेचा प्रभाव कमी करायचा असेल तर लसीकरणाची मोहीम अधिक वेगाने पुढे न्यायला हवी. तरुणांमध्ये संसर्गाची लागण अधिक दिसून येते. तिसऱ्या लाटेमध्ये हा प्रभाव कमी करून हर्ड इम्युनिटी तयार व्हायची असेल तर अधिक वेगाने लसीकरण होण्याची मागणी वैद्यकीय तज्ज्ञांकडून केली जात आहे.

Post a Comment

0 Comments