function downloadVideo() { const videoUrl = document.getElementById('videoUrl').value; // Implement logic to download the video (e.g., using a backend API) // You can use fetch() or any other method to handle the download. // Replace this placeholder with your actual download logic. console.log(`Downloading video from ${videoUrl}`); } वादळाचा विजेला 'धक्का'; ४६ लाख ग्राहकांना फटका

वादळाचा विजेला 'धक्का'; ४६ लाख ग्राहकांना फटका

म. टा. प्रतिनिधी, मुंबई तौक्ते चक्रीवादळात राज्य सरकारची महावितरण कंपनी कुचकामी ठरली. वादळाच्या तडाख्यामुळे संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रात अनेक ठिकाणी तासनतास नागरिकांना विजेविना घालवावे लागले. ठाण्यातील स्थिती सर्वांत वाईट होती. पण भर पावसातही महावितरणचे कर्मचारी, अभियंते रात्रभर बाहेर राहून वीजसेवा पूवर्वत करण्याचा प्रयत्न करीत होते, हे विशेष. मुंबई शहर व उपनगरात अदानी इलेक्ट्रिसिटी, टाटा पॉवर व बेस्टचेच वीजग्राहक सर्वाधिक आहेत. पण भांडुप, मुलुंड, ठाणे, नवी मुंबई, पालघर जिल्हा, कल्याण-डोंबिवलीपासून पुढे सर्वत्र महावितरणकडून वीजपुरवठा केला जातो. मुंबई महानगरमधील या भागातील नागरिकांना सोमवार ते मंगळवार सायंकाळपर्यंत विजेच्या लंपडावाचा त्रास सहन करावा लागला. कल्याण व डोंबिवलीच्या अनेक भागात सातत्याने वीज ये-जा करीत होती. पालघरमध्येही काही भागांत वादळादरम्यान नुकसान झाल्यानंतर सुमारे १२, १५, १८ तासांनी वीज आली. बदलापूर, अंबरनाथच्या नागरिकांनी २२-२२ तास विनावीज घालवले. वसई विरारमध्येही अनेक भागांत २४ तासांहून अधिक कालावधी वीजपुरवठा खंडीत होता. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील हिरानंदानी इस्टेटच्या रोमा उपकेंद्रात घोळ झाला. सोमवारी रात्री १०.४५ ला गेलेली वीज थेट मंगळवारी पहाटे ४ वाजता आली. त्याचा या भागातील साडेतीन हजार ग्राहक व जवळपास १२ हजार नागरिकांना फटका बसला. यानंतरही दिवसभरात चार ते पाच वेळा १०-१०, १५-१५ मिनिटांसाठी प्रवाह खंडित होतच होता. ठाण्यातीलच वसंत विहार भागातही बराचवेळ वीज नव्हती. याखेरीज ओवळा, कासारवडवली येथील नागरिकांनाही फटका बसला. ओव्हरहेड वाहिन्या धोकादायक या चक्रीवादळाचा भीषण फटका दक्षिण मुंबईला तसेच पश्चिम उपनगरांना बसला. या दोन्ही भागांत महावितरणची सेवा नाही. मुंबईभर सर्वत्र वीज खंडित झाल्याच्या निवडक घटनाच घडल्या. महावितरणच्या क्षेत्रात मात्र नागरिकांना जबर फटका बसला. अदानी इलेक्ट्रिसिटीच्या ९७ हजार ग्राहकांचा झाला. त्यातील ९१ टक्के वीज दोन तासांच्या आत सुरळीत झाली. महावितरणच्या ग्राहकांना मात्र मंगळवारी सायंकाळपर्यंत फटका सहन करावा लागला. याचे मुख्य कारण, ओव्हरहेड वाहिन्या ठरल्या. अन्य वीजवितरण कंपन्यांच्या वाहिन्या भूमिगत आहेत. महावितरण मात्र अद्यापही जुन्या पद्धतीने वीजवितरण करीत आहे. ४६ लाख ग्राहकांना फटका या चक्रीवादळामुळे राज्यातील जवळपास ४६ लाख ४१ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला, तर केवळ ३४ लाख १४ हजार ग्राहकांचाच सुरळीत वीज मिळाल्याचे स्वत: महावितरणने मान्य केले. सर्वाधिक फटका ठाणे जिल्ह्याला बसला असून, सात लाख ८५ हजार ५१९ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. मंगळवारी संध्याकाळपर्यंत त्यापैकी फक्त पाच लाख ५० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यातच यश मिळाल होते. रायगडमध्ये सात लाख ७३ हजार ७६० पैकी पाच लाख १० हजार व पालघरमधील पाच लाख ८८ हजार ७४३ ग्राहकांपैकी केवळ दोन लाख ४४ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश मिळाले.

Post a Comment

0 Comments