function downloadVideo() { const videoUrl = document.getElementById('videoUrl').value; // Implement logic to download the video (e.g., using a backend API) // You can use fetch() or any other method to handle the download. // Replace this placeholder with your actual download logic. console.log(`Downloading video from ${videoUrl}`); } तटरक्षक दल सुसज्ज; संभाव्य बचावकार्यासाठी गस्ती नौका, हेलिकॉप्टर तैनात

तटरक्षक दल सुसज्ज; संभाव्य बचावकार्यासाठी गस्ती नौका, हेलिकॉप्टर तैनात

म. टा. प्रतिनिधी, मुंबई अरबी समुद्रातील 'तौक्ते' चक्रीवादळादरम्यान बचावकार्य, तसेच मच्छिमारांना सुरक्षित ठिकाणापर्यंत नेण्यासाठी तटरक्षक दलाने चार मोठ्या नौका समुद्रात उतरवल्या आहेत. याशिवाय मुंबईसह दमणपासून ते मुरुड, रत्नागिरी, गोवा, मंगलोर येथील तळांवर लहान नौका सज्ज ठेवल्या आहेत. महाराष्ट्र ते केरळपर्यंतच्या या सर्व बचावकार्याचा समन्वय वरळीतील समुद्री बचाव समन्वय (एमआरसीसी) केंद्राकडून होत आहे. लक्षद्वीपजवळ तयार झालेले 'तौक्ते' चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने जात असल्याचे चित्र आहे. मात्र ते किनारपट्टीपासून जेमतेम १०० किमी अंतरावर आहे. त्याचा पश्चिम किनारपट्टीला स्पर्श होऊ शकतो. त्यामुळेच गोवा, कोकण किनारपट्टीला फटका बसू शकतो किंवा किनारपट्टीजवळील समुद्रातील मच्छिमार नौका संकटात येऊ शकतात. हे ध्यानात घेऊन नौका समुद्राकडे धाडण्यात आल्या आहेत, असे तटरक्षक दलातील सूत्रांनी 'महाराष्ट्र टाइम्स'ला सांगितले. केरळ-लक्षद्वीपदरम्यान 'आयसीजीएस विक्रम' ही नौका २ दिवसांपासून कार्यरत आहे; तर मुंबईहून 'आयसीजीएस समर्थ' व 'आयसीजीएस संकल्प' या युद्धनौका अरबी समुद्राकडे रवाना करण्यात आल्या आहेत. हे चक्रीवादळ शनिवारी दुपारी कर्नाटकला मागे सारून आणखी उत्तरेकडे कूच करू लागले. त्यामुळे वाऱ्यांचा जोर काहीसा कमी होताच शनिवारी दुपारी नवीन मंगलोर या तळावरून 'आयसीजीएस वराह' ही नौका मच्छिमारांच्या मदतीसाठी समुद्रात सोडण्यात आली, असे तटरक्षक दलातील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. या चारही नौका मोठ्या असल्याने त्या खवळलेल्या समुद्रात तग धरू शकतात. परंतु, लहान नौका या स्थितीत समुद्रात जाऊ शकत नाहीत. त्यामुळेच त्यांना सध्या किनाऱ्यावर सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे. त्या-त्या भागातील वादळाचा जोर ओसरला की लहान नौका तटरक्षक दलाकडून समुद्रात सोडल्या जाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याच वेळी रत्नागिरीच्या तळावरून डॉर्निअर विमानदेखील सातत्याने समुद्रावर घिरट्या घालून बचावकार्याची पाहणी करीत आहे. दुसरीकडे दक्षिण मुंबईतील 'आयएनएस शिक्रा' व गोव्यातील 'आयएनएस हंसा' या तळावर नौदलाची हेलिकॉप्टर सज्ज आहेत. सध्या नौदलाच्या युद्धनौका समुद्री सेतू-२ मोहिमेंतर्गत विदेशांतून प्राणवायू आणण्याच्या कार्यात आहेत. त्यामुळे त्यावर सध्या हेलिकॉप्टर तैनात केले जात नाही. परिणामी युद्धनौका समुद्रात असताना बचावाचा संदेश आल्यास हेलिकॉप्टरद्वारे नौदल बचाव करू शकणार नाही. परंतु, वातावरण उड्डाण करण्यायोग्य असल्यास तळावरून असे हेलिकॉप्टर धाडता येऊ शकेल, असे सूत्रांनी सांगितले. 'एनडीआरएफ'ची चार पथके तटरक्षक दलाकडून ही पूर्वतयारी सुरू असताना राष्ट्रीय आपत्ती बचाव पथकदेखील (एनडीआरएफ) या वादळादरम्यान बचावकार्यासाठी सज्ज आहे. 'एनडीआरएफ'ने सर्व प्रकारच्या मदतीसाठी मुंबईत चार पथके सज्ज ठेवली आहेत. प्रत्येक पथकात चार रबरी बोटींसह ४५ जवानांचा समावेश आहे. मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी व गरज भासल्यास सिंधुदुर्गपर्यंत जाऊन ही पथके सेवा देतील.

Post a Comment

0 Comments