function downloadVideo() { const videoUrl = document.getElementById('videoUrl').value; // Implement logic to download the video (e.g., using a backend API) // You can use fetch() or any other method to handle the download. // Replace this placeholder with your actual download logic. console.log(`Downloading video from ${videoUrl}`); } ...म्हणून घरदुरुस्ती, सजावटीची कामे रखडली

...म्हणून घरदुरुस्ती, सजावटीची कामे रखडली

म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई : एप्रिल-मे महिन्यात होणारी घरदुरुस्तीची कामे, रंगकामे, अंतर्गत घर सजावटीची कामे यंदा पुन्हा रखडली आहेत. गेल्या मार्चमध्ये हाती घेतलेली कामे ऑगस्टपर्यंत रखडल्याचेही चित्र होते. यंदाचे चित्र तेवढे संथ गतीने पुढे सरकत नसले, तरी कामाचा खोळंबा अनेक ठिकाणी झाला आहे. मजूर नसणे, कच्चा माल उपलब्ध न होणे, गृह सजावटीसाठी टाइल्स, खिडक्या, बाथरूममध्ये सजावटीसाठी लागणारे साहित्य न मिळणे, दुकानांमध्ये जाऊन प्रत्यक्ष निवड करता न आल्याने करावी लागणारी तडजोड यामुळे या कामांत अनेक अडचणी निर्माण होत आहेत. बांधकामाला परवानगी मिळाली असली, तरी गृहसजावट किंवा दुरुस्ती याबद्दल नियम स्पष्ट नसल्याने कामे पूर्वीच्या वेगाने करता येत नसल्याचे अनेक इंटिरिअर डिझायनर, सिव्हिल इंजीनिअर, आर्किटेक्ट, कंत्राटदार सांगत आहेत. विटा, रेती, वाळू यांची वाहतूक करायला परवानगी मिळत आहे. मात्र अनेक कामगार आपापल्या राज्यात निघून गेले आहेत. तसेच बिहार निवडणुकांच्या वेळीही अनेक कामगारांना बोलावून घेतल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. बांधकाम क्षेत्रासाठी दिलेले निर्देश अधिक स्पष्ट असणे अपेक्षित असल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञ नोंदवत आहेत. या क्षेत्रामध्ये अनेक घटक समाविष्ट असल्याने तसेच संघटनांचे छत्र नसल्याने या समस्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठीही अडचणी येत असल्याचे सांगण्यात येते. इंटिरिअर डिझायनर आकाश धोपटकर यांनी, महाराष्ट्राच्या बाहेरून येणारा माल मुंबईत येणे कठीण झाल्याचे सांगितले. माल इथे आला, तरी स्थानिक पातळीवर वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे. वाळू, सिमेंट याची मागणी फोनवर नोंदवता येते. मात्र टाइल्स, लाद्यांचे डिझाइन, दिवे अशा गोष्टींसाठी प्रत्यक्ष वापरकर्त्याला तिथे जाऊन पाहणे शक्य होत नाही. तसेच कामगारांना प्रत्येक वेळ कामाच्या ठिकाणी ठेवणे, त्यांच्यासाठी जेवणाची सोय किंवा जवळच एखादी खोली घेऊन तिथे ठेवणे, इमारतींच्या नियमांनुसार आठ ते पंधरा दिवसांनी करोनासंबंधी चाचण्या करून घेणे अशा अनेक गोष्टींचे अडथळे येत आहेत. पावसाळ्यापूर्वी व्हायला हवी असणारी स्वच्छतागृहांची कामेही रखडतील अशी शक्यता आहे. इंटिरिअर डिझायनर अमोल उतेकर यांनी, चार मजुरांऐवजी एकाच मजुराच्या मदतीने काम सुरू ठेवावे लागत असल्याचे सांगितले. माल उतरवून घ्यायलाही माणसे नाहीत अशीही स्थिती निर्माण होत आहे. या गोष्टींमुळे दोन महिन्यात होणारे काम दीर्घ काळ रेंगाळताना दिसत असल्याचे स्पष्ट केले.

Post a Comment

0 Comments