function downloadVideo() { const videoUrl = document.getElementById('videoUrl').value; // Implement logic to download the video (e.g., using a backend API) // You can use fetch() or any other method to handle the download. // Replace this placeholder with your actual download logic. console.log(`Downloading video from ${videoUrl}`); } आरोग्य योजनांचा लाभच नाही

आरोग्य योजनांचा लाभच नाही

म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई : संसर्गाच्या काळामध्ये अनेक संसर्गित तसेच गोरगरीब गरजू रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेसारख्या सरकारच्या आरोग्य योजनांचा लाभ मिळू शकला नाही. एखादी कंपनी जसे कॅशलेस सुविधा असलेले रुग्णालय उपलब्ध नसल्यास रुग्णांनी घरी परतल्यावर बिले जमा केल्यास या वैद्यकीय बिलांचा परतावा देते, त्याप्रमाणे महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत पात्र असलेल्या मात्र लाभ मिळू न शकलेल्या रुग्णांची बिले तपासून त्यांनाही परतावा मिळायला हवा, या मागणीने आता जोर धरला आहे. करोना संसर्गाच्या काळामध्ये अनेक रुग्णालयांनी लाखो रुपयांची बिले आकारून रुग्णांची अक्षरशः लूट केली. परवडत नाही तर खासगी रुग्णालयांमध्ये जाता कशाला असाही प्रश्न सर्रासपणे रुग्णांच्या कुटुंबीयांना विचारला जातो. मात्र प्रत्येकवेळी हा रुग्णाच्या कुटुंबीयांचा आग्रह नसतो, याचाही विचार सरकारने करण्याची गरज आहे. अनेक रुग्णांची आर्थिक परिस्थिती नसते. योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध नसतात. नाईलाज म्हणून प्राण वाचवण्यासाठी हा निर्णय कुटुंबीयांना घ्यावा लागतो. करोना संकटाच्या काळात सरकारनेही राज्यातील सर्व नागरिक महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत सुरक्षित आहेत, असे सांगितले आहे. 'ठाणे, पालघर, रायगड, अलिबाग, गडचिरोली अशा वेगवेगळ्या ठिकाणांहून रुग्णांनी वैद्यकीय उपचारांसाठी मुंबईला धाव घेतली. असे असताना सरकारने ताब्यात घेतलेल्या खाटांचीही उपलब्धता नाही, असे अनेक रुग्णालयांकडून सांगण्यात आले. या रुग्णांना त्यांच्या बिलाचा परतावा कॅशलेस सुविधेनुसार मिळायला हवा', अशी मागणी कोविडकाळात रुग्णहक्कासाठी काम करणारे मनविसे (ठाणे) जिल्हा अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी केली आहे. 'शहरातील रुग्णालयांनी आत्तापर्यंत किती रुग्णांना या योजनेंतर्गत बिले माफ केली, याची यादी जाहीर करण्यासह उच्च न्यायालयाच्या ७ मेच्या निर्देशानुसार करोना रुग्णांच्या बिलासंदर्भातील तक्रारींसाठी जिल्हा तक्रार व सनियंत्रण समिती स्थापन करावी, करोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, उद्योगधंदे बुडाले यामुळे केवळ केशरी शिधापत्रक धारकांनाच पात्र न समजता सर्व रुग्णांना या योजनेचा लाभ मिळवून द्यावा', असेही ते म्हणाले. 'प्रश्न गांभीर्याने सोडवा' अनेक खासगी रुग्णालयांनी करोना संसर्गाच्या काळामध्ये रुग्णांची मोठी लूट केली. पीपीई किटपासून जैवकचऱ्यासाठी वेगळे दर लावण्यात आले. यासंदर्भात आवाज उठवणाऱ्या रुग्णमित्र संघटनेचे विनोद साडविलकर यांनी, करोना संसर्ग आणि लॉकडाउनमध्ये गोरगरीब व सर्वसामान्यांची डबघाईला गेलेली आर्थिक परिस्थिती लक्षात घेता या मुद्द्यांकडे गांभीर्याने पाहण्याची निकड व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments