function downloadVideo() { const videoUrl = document.getElementById('videoUrl').value; // Implement logic to download the video (e.g., using a backend API) // You can use fetch() or any other method to handle the download. // Replace this placeholder with your actual download logic. console.log(`Downloading video from ${videoUrl}`); } लसीकरण सर्वांपर्यंत पोहोचणे आवश्यक - Lasikaran Sarvaparyat Pohochne Avashyak

लसीकरण सर्वांपर्यंत पोहोचणे आवश्यक - Lasikaran Sarvaparyat Pohochne Avashyak

म. टा. विशेष प्रतिनिधी : संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी मुंबईमध्ये लसीकरण सुरू झाले असले, तरीही या लसीकरणाचा लाभ अद्याप गोरगरीब, अशिक्षित तसेच चाळी आणि झोपडपट्ट्यांमधील लोकांना मोठ्या प्रमाणात मिळालेला नाही. त्यामुळे मुंबईतल्या सोसायट्या तसेच मोठ्या वसाहतींमधील वर्गाचे लसीकरण हे सरसकट सर्वांचे लसीकरण नाही, याकडे आरोग्य कार्यकर्त्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी लक्ष वेधले आहे. 


विक्रोळीमध्ये सर्वसामान्यांच्या आरोग्य सुविधांसाठी काम करणाऱ्या चेतन अहिरे यांनी लसीकरणासाठी आजही अनेकांची मानसिकता तयार झालेली नाही. ज्या व्यक्तीमध्ये शिक्षणाचा तसेच आरोग्याच्या संदर्भातील जनजागृतीचा अभाव आहे त्यांना लसीकरणाचे महत्त्व पटलेले नाही. लसीकरणासाठी तयारी झाल्यानंतर जेव्हा केंद्रावर लस उपलब्ध नसते, तेव्हा पुन्हा त्याच प्रक्रियेतून जाण्यासाठी या व्यक्तींना समजावून सांगावे लागते.



मालवणीमध्ये काम करणाऱ्या जनाबाई पाटील यांनी सांगितले, की 'लसीकरणामध्ये स्त्रियांचा सहभाग आजही वाढलेला नाही. खासगी केंद्रामध्ये लस उपलब्ध असली तरीही त्याची किंमत गरीबांना परवडत नाही. त्यामुळे तिथे जाऊन लसीकरण करण्यासाठी ते विशेष प्रयत्न करत नाही. अनेकांचे पोट हातावर असल्यामुळे रोजगार बुडेल या भीतीने त्यांची लसीकरणासाठी तासनतास रांग लावण्याची तयारी नसते. ही व्यवस्था सुरळीत करण्यासाठी अधिक सूक्ष्मपणे नियोजन करण्याची गरज आहे.' 


लसीकरण केल्यानंतर कोणते परिणाम होतात याची वैद्यकीय माहिती अनेक अशिक्षित व्यक्तींना नाही. गर्दी, संसर्गाची शक्यता आणि रोजगाराची चिंता यामुळे लसीकरणाचा वेग धीमा होता. आताही स्वतंत्र केंद्रानंतर लसीकरणाचा वेग म्हणावा तितका वाढलेला नाही, असे सांगितले जाते. लसीकरणासाठी व्यवस्था उपलब्ध करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी सांगितलेला अनुभव बोलका आहे. 




पालिका प्रशासनाने लसीकरण कोणत्या भागामध्ये किती प्रमाणात झाले याची वेगळी टक्केवारी काढणे गरजेचे आहे. केवळ झोपडपट्ट्यांमध्ये हर्ड इम्युनिटी आली इतके म्हणून लसीकरणाची या समूहाची गरज नजरेआड करता येणार नाही. लसीकरणाच्या डोसची उपलब्धता कमी राहिली तर या गरीब, अशिक्षित वर्गाला पुन्हा लसीकरणाकडे आकृष्ट करणे शक्य होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.


डॉ. एस. एस. पालव म्हणाले, की 'करोनाला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण करणे महत्त्वाचे आहे. जेव्हा अठरा वयोगटामध्ये लसीकरण सुरू होईल तेव्हा लसींच्या उपलब्धतेमध्ये हे उद्दिष्ट्य कसे साध्य करणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.' आधी नोंद करून लसीकरण करण्यापेक्षा लस घेतल्यानंतर नोंदणी करण्याचा मार्ग त्यांनी सुचवला. अॅपच्या उपलब्धतेमध्ये आर्थिक सामाजिक आरोग्यस्तराची नोंद झाली तर लसीकरणाचे लाभ, पुन्हा संसर्ग होण्याचे प्रमाण, निर्माण झालेली हर्ड इम्युनिटी या प्रत्येक बाबींचा गांभीर्याने अभ्यास करता येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments