function downloadVideo() { const videoUrl = document.getElementById('videoUrl').value; // Implement logic to download the video (e.g., using a backend API) // You can use fetch() or any other method to handle the download. // Replace this placeholder with your actual download logic. console.log(`Downloading video from ${videoUrl}`); } एसटी बसमधील उभ्या प्रवाशांना रोखण्याचे आव्हान

एसटी बसमधील उभ्या प्रवाशांना रोखण्याचे आव्हान

म. टा. प्रतिनिधी: मुंबई सेंट्रल करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी बाहेरगावी जाणाऱ्या रेल्वे आणि एसटी बसमध्ये प्रवाशांनी उभ्याने प्रवास करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहे. हे नियम संसर्ग वाढू नये म्हणून आवश्यक असले, तरी या नियमांचे पालन करताना प्रवासी आणि कर्मचारी यांच्यात वादाचे प्रसंग निर्माण होत आहे. यामुळे उभ्याने प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना रोखण्याचे आव्हान राज्य परिवहन महामंडळापुढे (एसटी) निर्माण झाले आहे. मुंबई महानगर प्रदेश आणि शहरांतर्गत होणाऱ्या वाहतुकीमध्ये प्रवासी वेळेत बचत व्हावी आणि प्रवाशांना वेगवान प्रवास अनुभवता यावा, यासाठी विनावाहक बससेवा सुरू आहे. मुंबई-बोरिवली, ठाणे-बोरिवली, दादर-कल्याण, नालासोपारा-भाईंदर, ठाणे-भाईंदर या मार्गावर या बसना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. एसटी फेऱ्यांची वारंवारता कमी आहे. एक बस गेल्यानंतर दुसऱ्या बससाठी सुमारे अर्धा-पाऊण तास वाट पहावी लागते. त्यातच वाहतूककोंडीमुळे प्रवासाचा वेळ वाढला आहे. अनेकदा न टाळता येणाऱ्या कामासाठी प्रवास करावा लागतो. यामुळे मास्कसह नियमांचे पालन करून प्रवेश असावा, अशी मागणी प्रवाशांकडून होते आहे विनावाहक बसमध्ये स्थानकातून बस सुटतानाच प्रवाशांना तिकिट देण्यात येते. मर्यादित आसनांनुसार प्रवासी पूर्ण झाल्यानंतर तिकिट देण्यात येत नाही. यामुळे प्रवासी वाहक, स्थानक प्रमुख, आगार व्यवस्थापक यांच्याशी वाद घालतात, याची कल्पना एसटी मुख्यालयात देण्यात आल्याचे एसटी वाहकांनी सांगितले. गर्दीच्या वेळी तणाव राज्य सरकारच्या आदेशानुसार केवळ ५० टक्के प्रवाशांना मुभा देण्यात आली आहे. सकाळी आणि सायंकाळी कार्यालयीन कामकाजाच्या वेळी गर्दी अचानक वाढते. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. अतिरिक्त गाड्या चालवल्यानंतर ही गर्दी विभागली गेली. कडक निर्बंधाचा पहिला दिवस असल्याने मुंबईसह ठाणे, पनवेल, उरण या स्थानकात गोंधळाचे चित्र होते. मात्र एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रवाशांची कशीबशी समजूत काढत प्रवाशांवर नियंत्रण मिळवले होते, असे एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments