function downloadVideo() { const videoUrl = document.getElementById('videoUrl').value; // Implement logic to download the video (e.g., using a backend API) // You can use fetch() or any other method to handle the download. // Replace this placeholder with your actual download logic. console.log(`Downloading video from ${videoUrl}`); } गृहखात्यानंतर महसूल खात्यातील बदल्यांबाबत नाराजी?

गृहखात्यानंतर महसूल खात्यातील बदल्यांबाबत नाराजी?

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई गृह खात्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण बदल्यांचे प्रकरण यांच्यावर शेकले असताना, अन्य खात्यांमध्ये संबंधित खात्यांच्या सचिवांनी बदली कायद्यानुसार केलेल्या शिफारशी डावलून मंत्र्यांनी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याचा नाराजीचा सूर उमटत आहे. गृह खात्यापेक्षा अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये महसूल खात्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांना अधिक महत्त्व असून या खात्यात निवड समितीच्या शिफारशी डावलून खास बाब म्हणून काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असल्याचे सांगण्यात येते. पोलिस अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण बदल्यांबाबत वरिष्ठ पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या अहवालानंतर अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा विषय ऐरणीवर आला आहे. एका पदावर तीन वर्षे झाल्यानंतर अधिकारी बदलीला पात्र ठरतो, असा अधिकाऱ्यांच्या बदलीचा कायदा आहे. परंतु यात अनेक अधिकारी पळवाट काढतात. खास अधिकाऱ्यांना क्रीम पोस्टिंग दिली जाते. राज्यात महसूल खात्याची आस्थापना सर्वांत मोठी आहे. यातील अधिकाऱ्यांमध्ये चांगल्या पदासाठी अर्थपूर्ण स्पर्धा असते, असे या वरिष्ठ सचिवांचे मत आहे. कोविडच्या कालखंडातही महसूल विभागात तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. निवड समितीने केलेल्या बदल्यांच्या शिफारशी डावलून काही अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या पदांवर बदल्या केल्या गेल्या असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. महसूल विभागाचे उपजिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी हे अन्य विभागांत प्रतिनियुक्तीवर जातात. त्यांच्या प्रतिनियुक्त्या रद्द करून त्यांना मूळ महसूल खात्यात परत आणण्याचा निर्णय प्रशासकीय स्तरावर घेण्यात आला होता. परंतु मंत्रीस्तरावर तो बदलण्यता आल्याचे सांगण्यात येते. काही मर्जीतील अधिकाऱ्यांनाच क्रीम पोस्टिंग दिली जाते, असा महसूल विभागातील अधिकाऱ्यांचा तक्रारीचा सूर आहे. तसेच काही अधिकाऱ्यांना तीन वर्षे पूर्ण होण्याआधीच त्यांच्या बदल्या केल्या आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी मॅटमधून बदली रद्द करण्याचे आदेश आणले, परंतु त्यांना केराची टोपली दाखवली गेली. त्यामुळे बदल्यांच्या कायद्यानुसार स्थापन केलेली निवड समितीने शिफारशीप्रमाणे बदल्या होत नसल्याचे अधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. मुंबई, ठाणे, नाशिक,पुणे, रायगड आदी जिल्ह्यांतील महसूल अधिकाऱ्यांच्या पदांना महत्त्व असून येथील पदांसाठी मोठी अर्थपूर्ण स्पर्धा अधिकाऱ्यांमध्ये असल्याचे सांगण्यात येते.

Post a Comment

0 Comments