function downloadVideo() { const videoUrl = document.getElementById('videoUrl').value; // Implement logic to download the video (e.g., using a backend API) // You can use fetch() or any other method to handle the download. // Replace this placeholder with your actual download logic. console.log(`Downloading video from ${videoUrl}`); } Uddhav Thackeray: राज्याच्या हितासाठी 'तो' कटूपणा घेतला; लॉकडाऊनबाबत CM ठाकरे म्हणाले...

Uddhav Thackeray: राज्याच्या हितासाठी 'तो' कटूपणा घेतला; लॉकडाऊनबाबत CM ठाकरे म्हणाले...

मुंबई: राज्यात संसर्गाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तिसरी लाट आलीच तर त्यात लहान मुलांना सर्वाधिक धोका असेल असे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात बालरोग तज्ज्ञांचा टास्कफोर्स स्थापन करण्यात आला आहे. या टास्क फोर्सच्या मार्गदर्शनपर कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री यांनी लॉकडाऊनबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. लॉकडाऊनच्या निर्णयात सरकारची साथ देत असलेल्या नागरिकांचेही मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत. राज्यात करोनाची साखळी तोडण्यासाठी १ जूनपर्यंत लावण्यात आला असून त्यापुढे लॉकडाऊन वाढवला जाणार की नाही याबाबत अनेक तर्क लावले असताना मुख्यमंत्र्यांनी केलेले विधान अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. ( ) वाचा: 'लॉकडाऊन लावण्याचा निर्णय अत्यंत कठोर आणि कटू असतो. आपल्या हालचालींवर बंधनं टाकणं आणि तीसुद्धा रोजीरोटीवर बंधनं टाकणं याच्यासारखा कठोर निर्णय किंवा शिक्षा असूच शकत नाही. ही सुरुवात कुणी करायची, असा एक प्रश्न होता. करोना संसर्ग उच्चांक गाठत असताना देशभरात भीतीचं वातावरण होतं पण मी ठामपणे लॉकडाऊनचा निर्णय घेतला. राज्याच्या हितासाठीच मी हे पाऊल उचललं. राज्याच्या हितासाठी कटूपणा घ्यायची माझी तयारी आहे, असे मी नेहमी सांगतो आणि त्यानुसार मला हा निर्णय घ्यावा लागला. हा निर्णय घेतल्यानंतर नागरिकांनी खरोखरच त्याला मनापासून सहकार्य केलं. त्यातूनच आज करोनावर नियंत्रण मिळवता आलं आहे पण अजून या लढाईत आपल्याला यश मिळालेलं नाही. हे यश मिळेपर्यंत आपली लढाई सुरूच राहणार आहे', असे नमूद करत मुख्यमंत्री ठाकरे यांनी लॉकडाऊनबाबत मोठे संकेत दिले. वाचा: गेल्यावर्षी याच दिवसांमध्ये करोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली होती. तेव्हा वेगाने पावले टाकणारे हे कदाचित देशातील पहिले राज्य होते. हॉस्पिटल्स कमी पडतील, बेड्स कमी पडतील हा विचार करून आपण जम्बो फॅसिलीटी तयार केल्या. काही फिल्ड हॉस्पिटल्स उभी केली. त्यासोबतच तज्ज्ञ डॉक्टरांचा आपण तयार केला. यात मी केवळ निमित्तमात्र आहे. आज करोनावर नियंत्रण आल्याचं जे काही चित्र आपल्याला दिसतंय त्याचं सगळं श्रेय मला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे तज्ज्ञ डॉक्टर्स, अहोरात्र राबत असलेले आरोग्य कर्मचारी, परिचारिका, पोलीस, स्वयंसेवी संस्था, शिवसेनेसह सर्व पक्षांचे कार्यकर्ते आणि विशेष म्हणजे नागरिकाना जाते, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. वाचा: मुख्यमंत्री घरी बसून काम करतात, या विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना करोनावर टीमवर्कमुळे कसे नियंत्रण मिळवले यावर मुख्यमंत्र्यांनी प्रकाश टाकला. 'एकटा कॅप्टन काहीच करू शकत नाही. त्याची टीमही तेवढीच मजबूत असणं आवश्यक असतं आणि माझी टीम मजबूत आणि कुशल आहे. मला नक्कीच त्याचा सार्थ अभिमान आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. मुलांमधील संसर्गाबाबत बेसावध राहू नका कोविड विरुद्धच्या लढ्यात डॉक्टर्सना मोठ्या प्रमाणावर सहभागी करून घेण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेस वाढता प्रतिसाद असून आज या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील ६ हजार ३०० बाल रोग तज्ज्ञांना राज्य शासनाच्या कोविड विषयक बाल रोग तज्ज्ञ टास्क फोर्सने वैद्यकीय उपचाराबाबत मार्गदर्शन केले. मुलांमध्ये कोविड आणि कोविडशी संबंधित मानसिक व भावनिक आरोग्याकडे लक्ष देण्यावर देखील चर्चा झाली. लहान मुलांमधील संसर्गाबाबत बेसावध राहू नका, वेळीच डॉक्टरला दाखवा, कोविडविरुद्धची आपली एकजुटीची साखळी मजबूत ठेवून या विषाणूला पराभूत करू, असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. वाचा:

Post a Comment

0 Comments