function downloadVideo() { const videoUrl = document.getElementById('videoUrl').value; // Implement logic to download the video (e.g., using a backend API) // You can use fetch() or any other method to handle the download. // Replace this placeholder with your actual download logic. console.log(`Downloading video from ${videoUrl}`); } Rajeev Satav Death: राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहताना राहुल गांधी झाले भावुक; म्हणाले...

Rajeev Satav Death: राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहताना राहुल गांधी झाले भावुक; म्हणाले...

मुंबई: यांचे निधन झाले यावर आजही विश्वास बसत नाही. त्यांच्या निधनाने सातव परिवारावर जेवढा मोठा आघात झाला आहे तेवढाच आघात पक्षावरही झाला आहे. राजीव यांची दोन कुटुंबं होती एक त्यांची आई, पत्नी व मुले आणि दुसरे काँग्रेस पक्ष. राजीवमध्ये एक चमक आहे हे पहिल्याच भेटीत दिसले होते, त्यांनी नेहमी पक्षासाठी उत्तम काम केले. राजकारणात त्यांनी विविध पदांची जबाबदारी यशस्वीपणे पार पडली. राजीव कधीच कोणाबद्दलही वाईट बोलत नसे. लोकसभेत काँग्रेस पक्षाचे ४५ सदस्य असताना ते ५-७ व्यक्तींचे काम एकटेच करत असत. राजीव यांच्या निधनाने मी एक चांगला सहकारी व मित्र गमावला आहे. राजीव आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांच्या परिवाराच्या पाठीशी काँग्रेस पक्ष सदैव भक्कपणे उभा राहील, अशा शोकभावना खासदार यांनी व्यक्त केल्या आहेत. ( ) वाचा: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ऑनलाइन श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते, यावेळी राहुल गांधी बोलत होते. आपल्या भावना व्यक्त करताना राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी म्हणाल्या की, राजीव यांना श्रद्धांजली अर्पण करत आहे यावर विश्वास बसत नाही. अत्यंत शांत स्वभावाचा, पक्षाशी निष्ठा असणारा, कामाच्या जोरावर पक्षात विविध जबाबदाऱ्या भूषवणारे, पक्ष कार्याला प्रथम महत्त्व देणारे राजीव यांचे एवढ्या कमी वयात निधन होईल असे वाटले नव्हते. ते एक लढवय्या नेता होते पण कोरोनाविरुद्धची लढाई ते हरले. राजीव यांच्या निधनाने आमच्या परिवारातील एक सदस्य गेल्याचे दुःख आहे. सातव कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो हीच प्रार्थना. वाचा: मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, करोनाने आमचा एक युवा साथीदार आम्हाला सोडून गेला हे मनाला पटत नाही. पक्षासाठी सदैव तत्पर असणारा, पक्षनेतृत्वाचा विश्वास मिळवणारा, काम करण्याची प्रचंड क्षमता असलेला, काँग्रेस पक्षातील पुढच्या पिढीतील भवितव्य असणारा सहकारी आम्ही गमावला. ते वंचितांचा आवाज, तरुणांचे प्रेरणास्रोत होते. कमी वयातच त्यांनी कारकीर्दीला सुरुवात करून आपल्या कामाच्या बळावर राष्ट्रीय पातळीवर ते पोहचले. संसदेत ते सामान्य जनतेसाठी आवाज उठवत असत. फुले, शाहु, आंबेडकरांच्या विचारांवर त्यांची श्रद्धा होती. गुलाम नबी आझाद म्हणाले की, राजीव सातव यांच्या अकाली निधनाने मोठा धक्का बसला आहे. राजीव लहान असल्यापासून आपण त्यांना ओळखत होतो. त्यांच्या कुटुंबीयांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या निधनाने सातव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, त्यांच्या निधनाने पक्षाचा तसेच कुटुंबाचा मोठा आधार गेला आहे. म्हणाले की,राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी राजीव सातव यांच्यावर नेहमीच मोठ्या विश्वासाने जबाबदारी सोपवली आणि त्यांनी ती जबाबदारी प्रत्येकवेळी उत्तमरितीने पार पाडून नेतृत्वाचा विश्वास सार्थ ठरवला. वंचित, मागास समाजाचे प्रश्न ते मोठ्या हिरीरीने मांडत असत. त्यांच्या निधनाने आपण एक तरुण नेतृत्व गमावले आहे. वाचा: एच. के. पाटील, के. सी. वेणुगोपाल, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, मुकुल वासनिक, माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, मत्ससंवर्धन मंत्री अस्लम शेख, दूग्धविकास मंत्री सुनील केदार, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, उपाध्यक्ष मोहन जोशी, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांनीही सातव यांना श्रद्धांजली वाहिली. वाचा:

Post a Comment

0 Comments