function downloadVideo() { const videoUrl = document.getElementById('videoUrl').value; // Implement logic to download the video (e.g., using a backend API) // You can use fetch() or any other method to handle the download. // Replace this placeholder with your actual download logic. console.log(`Downloading video from ${videoUrl}`); } पाचशेची नोट मोडणार; मासळीचे दर महागले

पाचशेची नोट मोडणार; मासळीचे दर महागले

म. टा. प्रतिनिधी : आधीच करोनाचे निर्बंध व त्यात तौक्ते चक्रीवादळ याचा जबर फटका मासळी बाजाराला बसला आहे. परिणामी मुंबईच्या बाजारात ५० टक्क्यांहून अधिक महागले आहेत. मुंबईत जवळपास ६ हजार मच्छिमार बोटी आहेत. त्याद्वारे दररोज सरासरी ६ लाख किलो मासळी मुंबईत येते. यापैकी काही मासे हे रायगडहूनदेखील येतात. यंदा मात्र करोनासंबंधी निर्बंधांमुळे मुंबईतील स्थानिक मासळी जवळपास एप्रिलच्या संपूर्ण महिनाभर बाजारात आलीच नाही. रायगडची आवकदेखील कमीच होती. त्यात मागील आठवडाभरापासून चक्रीवादळामुळे बोटी समुद्रात गेल्याच नाहीत. त्याचा परिणाम मासळी बाजारावर झाला आहे. याबाबत महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी सांगितले, 'स्थानिक किंवा कोकण, गोव्याची मासळी उपलब्ध होत नसल्यास ओरिसा, आंध्र प्रदेशातून आवक होते. पण यंदा करोना संकटामुळे ही आवक अत्यल्प झाली. त्यात पूर्वेकडील राज्यात १ एप्रिल ते १ जूनदरम्यान मच्छिमारी होतच नाही. त्यामुळे तेथील आवक जवळपास बंद आहे. आता चक्रीवादळाचाही फटका बसला आहे. या वादळामुळे केरळपासून कर्नाटक, गोवा, कोकण व स्थानिक मासळी बाजारात आलेलीच आहे. सध्या एकूण मागणीच्या ९० टक्के आवक घटली आहे.' मुंबईच्या बाजारात मुशी, बोंबिल, कोळंबी, पापलेट व सुरमई या मासळींना सर्वाधिक मागणी असते. मार्चपर्यंत या मासळींचा दर साधारण १२० ते ४०० रुपये किलो होता. तो आता २२० ते ८०० रुपये किलोवर गेला आहे. मुशी व पापलेट तर बाजारात उपलब्धच नाहीत. काही निवडक मच्छिमारांकडे हा माल आहे, पण तूट असल्याने दर खूप अधिक आहेत. चक्रीवादळामुळे १४ मेपासून बंद असलेली मच्छिमारी गुरुवारी सुरू झाली. मच्छिमारांनी गुरुवारी बोटी समुद्रात सोडल्या. जवळच मच्छिमारी करणारे एक दिवसात मासळी घेऊन परततील. पण दूरवर मच्छिमारी करणारे किमान दहा दिवसांनी येतील. त्यामुळेच अधिक मागणीच्या या आठवडाअखेरीस बाजारात फार प्रमाणात मासळी उपलब्ध नसेल, असे मच्छिमारांचे म्हणणे आहे. मासळीचे घाऊक दर असे (किलो रुपयांत) प्रकार आधीचे आताचे दर मुशी १२० २००-२२० कोळंबी ३०० ६००-६५० बोंबिल २०० ३२०-३५० सुरमई १५० २८०-३०० रोहू १८० २९०-३२० ट्युना (कोपू) ५०० ८५०-९०० पापलेट ३५० ६००-६५०

Post a Comment

0 Comments