मुंबई: देशात महामारीची स्थिती हाताबाहेर गेली असून रोजच्या रोज रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्याचबरोबर, औषधे आणि लसीच्या तुटवड्यावरूनही ओरड सुरू आहे. या सगळ्या परिस्थितीला केंद्रातील मोदी सरकार जबाबदार असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते यांनी याच मुद्द्यावरून पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. (NCP Leader , Bihar Government Over Corona Situation) वाचा: 'उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये भाजपने रामराज्याची भाषा केली होती, परंतु दोन्ही राज्यांना भाजपने रामभरोसे सोडलं आहे. उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये नदीमध्ये प्रेतं टाकलेली आढळली आहेत. यमुना नदीत आणि हमीरपूरच्या नदीत ४० हून अधिक प्रेतं दिसली आहेत. येथील परिस्थिती चांगली नाही हे यावरून स्पष्ट दिसत आहे. यूपी, बिहारच्या कुठल्याही गावात, कुठल्याही प्रकारे करोनाच्या चाचण्या होत नाहीएत. तिथं डॉक्टर नाहीत. लोकं दिवसा डोळे उघडतात आणि संध्याकाळी मृत्यू होताहेत. प्रेतं जाळण्यासाठी लाकडं नाहीत. त्यामुळं गंगा आणि यमुनेच्या किनारी प्रदेशातील लोक मृत नातलगांची प्रेतं नदीत टाकली जात आहेत हे वास्तव आहे,' असं मलिक यांनी म्हटलं आहे. 'माझं मूळ गाव उत्तर प्रदेशात आहे. तिथून लोक मला फोन करताहेत. प्रत्येक जिल्ह्यातून माहिती मिळतेय. उत्तर प्रदेशात भयावह स्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडं योगी आदित्यनाथ सरकार जाहिराती करून सत्यापासून लांब पळत आहे,' असा आरोपही मलिक यांनी केला आहे. वाचा: देशमुखांवरील कारवाई राजकीय हेतूने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवरही मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'देशमुखांवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई राजकीय हेतूने प्रेरित आहे. सत्तेचा गैरवापर करून त्यांना बदनाम करण्यासाठी कारस्थान सुरू आहे, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. 'ज्या काही कायदेशीर बाबी असतील, त्या तपासाला अनिल देशमुख सहकार्य करतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
0 Comments