function downloadVideo() { const videoUrl = document.getElementById('videoUrl').value; // Implement logic to download the video (e.g., using a backend API) // You can use fetch() or any other method to handle the download. // Replace this placeholder with your actual download logic. console.log(`Downloading video from ${videoUrl}`); } 'देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राबद्दल खोटी बातमी पसरवत आहेत'; राष्ट्रवादीचा घणाघात

'देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राबद्दल खोटी बातमी पसरवत आहेत'; राष्ट्रवादीचा घणाघात

मुंबई : 'जगभर महाराष्ट्राच्या कामाची नोंद लोक घेत आहेत. मुंबई मॉडेलची चर्चा होत आहे. मात्र हे पचत नसल्याने विरोधी पक्षनेते हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून महाराष्ट्राबद्दल खोटी बातमी पसरवण्याचे काम करत आहेत,' असा घणाघाती आरोप काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री यांनी केला आहे. करोनाच्या बाबतीत गंभीरतेने राज्य सरकार काम करत आहे. करोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा किंवा मृतांचा आकडा लपवला नाही. राज्यात ६ हजार २०० लॅब तयार करण्यात आले. जास्तीत जास्त आरटीपीसीआरच्या टेस्ट करण्यात आल्या. ही सर्व माहिती उघडपणे जनतेसमोर ठेवल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. सुप्रीम कोर्ट असेल किंवा विविध कोर्ट असतील, नीती आयोग यांनी कामाची प्रशंसा केली हेच विरोधी पक्षनेत्याला पचत नाही, अशी खोचक टीकाही नवाब मलिक यांनी केली. 'महाराष्ट्रातील चांगलं काम पचत नाही' 'गुजरातमध्ये ७१ दिवसात ६१ हजार कोरोना पॉझिटिव्ह केसेस लपवण्यात आल्याची बातमी समोर येत आहे. गोव्यात ऑक्सिजन मिळत नसल्याने रोज लोकांचा मृत्यू होत आहे. उत्तर प्रदेशमध्ये २ हजार लोकांचे मृतदेह नदीमध्ये फेकण्यात आल्याची बातमी आहे. म्हणजे जिथे-जिथे डबल इंजिनचं सरकार आहे ते विफल झालं आहे, असं दाखवून महाराष्ट्रातील चांगलं काम पचत नाही. महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा उद्योगच यांनी सुरु केला आहे,' असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना चांगली कामे दिसत नसतील तर मग इलाज करु शकत नाही. मात्र महाराष्ट्रात चांगली कामे होत आहेत ही सत्य परिस्थिती आहे, असा दावाही नवाब मलिक यांनी केला आहे.

Post a Comment

0 Comments