function downloadVideo() { const videoUrl = document.getElementById('videoUrl').value; // Implement logic to download the video (e.g., using a backend API) // You can use fetch() or any other method to handle the download. // Replace this placeholder with your actual download logic. console.log(`Downloading video from ${videoUrl}`); } प्राणीमित्र, सर्पमित्रांचा फोन खणाणता

प्राणीमित्र, सर्पमित्रांचा फोन खणाणता

म. टा. विशेष प्रतिनिधी : तौक्ते चक्रीवादळाने दिलेल्या फटक्याचा परिणाम माणसांबरोबरच मुंबईतील जैवविविधतेवरही झाला आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये प्राणीप्रेमी, पक्षीप्रेमी आणि सर्पमित्रांना अनेक फोन आले आहेत. अनेक ठिकाणी पक्ष्यांची घरटी मोडून पडल्याचे आढळून आले आहे. या प्राणी-पक्ष्यांना जपण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मुंबईतील 'सर्प' या संस्थेच्या माध्यमातून मंगळवारी एकूण ३० प्राणी-पक्ष्यांची सुटका करण्यात आली. यामध्ये १० सरपटणारे प्राणी, सात सस्तन प्राणी तर १३ पक्ष्यांचा समावेश आहे. पक्ष्यांमध्ये अंधेरी ते वांद्रे परिसरातून सहा घारींच्या सुटकेसाठी सर्प संस्थेला फोन आल्याचे संतोष शिंदे यांनी सांगितले. २ दयाळ पक्षी, २ कबुतरे, ३ खडपाकोळी, १ कासव, १ घोणस, ३ धामण, ३ नाग आदींचा यात समावेश आहे. पालघरहून शिंदे यांना सोमवारी, एका दयाळ पक्ष्याचे घरटे पडून त्यातील दोन पिल्ले घराबाहेर पडल्याचा फोन आला होता. मात्र सोमवारी पावसामुळे पालघरपर्यंत पोहोचणे शक्य नव्हते. त्यामुळे सोमवारी या पिल्लांना घरामध्ये खोक्यात ठेवण्यात आले. मंगळवारी जोर कमी झाल्यावर सर्प संस्थेचे कार्यकर्ते पालघरमध्ये पोहोचले. त्यांनी पालघरमधील पक्षीप्रेमींनी ही पिल्ले ज्या ठिकाणी पडली होती तिथे एका पारदर्शक पिंजऱ्यात ठेवले. त्यांच्या आवाजाला प्रतिसाद देत त्यांचे आई-वडील तिथे पुन्हा येऊन त्यांनी पिल्लांना खाऊ घातल्याचे या पक्षीप्रेमींना आढळले. त्यानंतर एका कृत्रिम घरट्यामध्ये या पिल्लांना ठेवण्यात आले. हे घरटेही दयाळ पक्ष्यांनी स्वीकारल्याचे त्यांना दिसले. 'पॉज' या संस्थेचे संस्थापक सुनीश कुंजू यांनी मंगळवारी अनेक पक्ष्यांची सुटका करण्यासाठी लोकांनी संपर्क साधल्याचे सांगितले. मंगळवारच्या एका दिवसामध्ये पाच खारी, तीन पक्षी आणि पाच सापांच्या सुटकेसाठी पॉजच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. मुंबईमध्ये अशा अनेक संस्था मंगळवार, बुधवारी या दोन दिवसांमध्ये कार्यरत होत्या. मुंबईमध्ये पडललेली झाडे उचलण्याचे काम सातत्याने सुरू असल्याने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांबरोबर पर्यावरणप्रेमींनीही या झाडावरील घरटी, त्यामध्ये पक्षी, पिल्ले अडकली आहेत का हे पाहण्याचा आणि त्यांच्या सुटकेचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.

Post a Comment

0 Comments