मुंबईः गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर () यांची सुरू झाली आहे. या बैठकीत प्रामुख्याने राज्यात पूर्ण लॉकडाउन लागू करावा का, तो ८ दिवसांचा असावा की १४ दिवसांचा असावा, याबाबत विचारविनिमय केला जात आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात ८ दिवसांच्या कडक लॉकडाऊनची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीला राज्यातील प्रसिद्ध डॉक्टर्स उपस्थित असून काही इतर तज्ज्ञही सहभागी असल्याचे समजते.
(chief minister uddhav thackeray starts meeting with task force to take decision on lockdown) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सुरू असलेली ही टास्क फोर्सची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात येत आहे. मुख्यमंत्री आपल्या वर्षा या निवासस्थानाहून या बैठकीत उपस्थित झाले आहेत. या बैठकीत राज्यातील कोरोना संसर्गाबाबतचा आढावा घेतला जात आहे. त्याच प्रमाणे राज्यातील लसीकरणाची स्थितीवर देखील सविस्तर चर्चा केली जात आहे.
0 Comments